PM Modi News: PM Modi यांनी आज (दि. 24 मार्च 2026 रोजी) राज्यसभेमध्ये मिडल इस्ट येथे चाललेल्या युद्धाबद्दल आणि त्यामुळे भारतावर होणाऱ्या परिणाम विषयी तसेच पश्चिम आशियातील परिस्थितीवर फार महत्त्वाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच भारताच्या गॅस आणि तेल शॉर्टेज बाबतीत आणि गर्ल देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेबद्दलही वक्तव्य केले.
LPG Gas & Oil Shortage
पीएम मोदी यांनी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींबाबत विचार मांडले असले तरी त्यांनी केलेल्या एका संभाषणामुळे लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे जाणवले. त्यांनी राज्यसभेच्या या भाषणादरम्यान लोकांना असे आव्हान केले की कोरोना काळात जसे आपण लॉकडाऊन परिस्थितीत सुद्धा सगळे नियोजन केल्यामुळे सुरळीत पार पाडले तसेच आताही भारत सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु पुन्हा लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केलेल्या विधानानुसार बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी जनतेपुढे आल्या आहेत. मोदी भाषणामध्ये असे म्हणाले की भारत सरकार LPG गॅस तसेच क्रूड ऑइल मिळवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे. त्यांनी पुढे असे सांगितले की ज्या कुठल्याही मार्गाने आपल्याला गॅसवर क्रूड ऑइल मिळवण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने प्रयत्न करत आहेत आणि मिडल इस्ट मध्ये होणाऱ्या युद्धामुळे जो काही पश्चिम आशिया वरती वाईट परिणाम झाला आहे त्यावर लढा देण्याचा सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. या सर्व युद्ध परिस्थितीमध्ये भारताचे काय भूमिका असणार याबद्दलही त्यांनी काही विधान केलेले आहे.
असे सांगितले की या युद्धामुळे ऊर्जा विभागावर (म्हणजेच क्रूड ऑइल आणि LPG गॅस) गंभीर संकट आलेले आहे. पण सरकार तेल व गॅस मिळवण्याचे संपूर्ण प्रयत्न जरी करत असले तरी सुद्धा जर या युद्ध परिस्थितीमुळे जर ते मिळवणे शक्य झाले नाही तर त्याचे अगदी गंभीर परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यासाठी तयारी ठेवण्याचे आव्हान त्यांनी भारताच्या जनतेला केले आहे.
LPG शॉर्टेजचे सामान्य नागरिकांवर काय दुष्परिणाम होत आहेत?
पीएम मोदी यांनी असे सांगितले की सामान्य नागरिकांना एलपीजी शॉर्ट मुळे कुठलाही त्रास होणार नाही याची ते पूर्णतः दक्षता घेत आहेत. असे असले तरी व्यापारी वर्ग किंवा कमर्शियल वापरण्यासाठी एलपीजी उपलब्ध होत नाहीये. म्हणजेच हॉटेल आणि हॉस्टेल्स सारख्या सामान्य व्यापाऱ्यांना सुद्धा एलपीजी मिळणे कठीण झाल्यामुळे त्याचा फटका कुठे ना कुठे सामान्य वर्गाला नक्कीच पडणार आहे.
Video Credit: @TheLallantop
भारतातील बरेच नागरिक गल्फ देशांमध्ये अगदी छोट्या कारागिरापासून मोठ्या ऑफिसर्स पर्यंतचे काम करताना आढळतात. या नागरिकांच्या सुरक्षिततेचे व त्यांना वेळ पडल्यास पुन्हा भारतात आणायची सुद्धा तयारी मोदी यांनी दाखवले.
तब्बल चार आठवडे झाले पश्चिम आशियातील हे युद्ध संघर्ष चालू आहे. या संघर्षामुळे हर्मोसच्या समुद्रातून जाणारे व्यापारी मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इजराइल ने संयुक्तपणे इराणवर लष्करी हल्ला केला. ज्या हल्ल्यादरम्यान इराणचे 86 वर्षीय सर्वोच्च नेते आया तुला अली खानिने मारले गेल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
